Home मराठी Maharashtra | ईडीच्या आडून भाजप सूडाचं राजकारण करतंय : अनिल देशमुख

Maharashtra | ईडीच्या आडून भाजप सूडाचं राजकारण करतंय : अनिल देशमुख

728

मुंबई ब्यूरो: ईडीच्या आडून भारतीय जनता पक्ष (भाजप) सूडाचं राजकारण करतंय ही गंभीर बाब आहे असे मत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

भाजप नेत्यांच्या विरोधात किंवा धोरणाविरोधात बोलल्यावर लगेच ईडीची नोटीस पाठवण्यात येते. हेच काम सुरुवातीला सीबीआय करत होते. परंतु राज्यात चौकशी करायची असेल तर राज्यसरकारची परवानगी घ्यावी लागेल असा निर्णय राज्य सरकारने घेतला त्यामुळे सीबीआयबाबत आता केंद्र काही करु शकत नाही अशी माहितीही अनिल देशमुख यांनी यावेळी दिली.

ईडीचा ज्यापध्दतीने राजकारणासाठी वापर होतोय. ते पाहून अशा प्रकारचं राजकारण देशात कधी पाहण्यात आलं नाही असेही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).